संवेदना प्रकल्पाचे कार्य" दिव्यांग व्यक्तीसाठी महत्वपुर्ण आहे. मा.ना.मनसुखभाई मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारत सरकार
संवेदना प्रकल्पाचे कार्य" दिव्यांग व्यक्तीसाठी महत्वपुर्ण आहे. मा.ना.मनसुखभाई मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारत सरकार
संवेदना प्रकल्पाचे कार्य" दिव्यांग व्यक्तीसाठी महत्वपुर्ण आहे. मा.ना.मनसुखभाई मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारत सरकार
संवेदना प्रकल्पाच्या वतीने दिव्यांगांसाठी फिजीओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, विशेष शिक्षण,विविध श्रेणीतील घटकांसाठी प्रशिक्षण चालते. दिव्यांगांसाठी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे यामुळे दिव्यांगांना रोजगार निर्मिती होणार आहे. दिव्यांगांसाठी सुसज्ज अशा इमारतीमध्ये सुरु असणारे संवेदना चे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन मा.ना.मनसुखभाई मांडवी, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री यांनी केली. संवेदना प्रकल्पास भेट देवून सर्व उपक्रमांची माहिती घेतली. दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन वार्तालाप केला. सोबत लातूर चे मा. खासदार सुधाकर शृंगारे , प्रकल्पाचे अध्यक्ष डाॅ.राजेश पाटील, कार्यवाह डाॅ योगेश निटुरकर, संपर्क प्रमुख श्री सुरेशदादा पाटील होते. दिव्यांगांसाठी वैश्विक कार्ड काढण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांची बैठक घ्यावी. आदी विषयांबाबत केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य श्री. सुरेशदादा पाटील यांनी मंत्री महोदयांना विनंती केली.
प्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, श्री राजु गायकवाड, श्री वेजीनाथ व्हनाळे, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.