2 दिवसीय "सेवा तरंग " या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या संस्था प्रतिनिधींसाठी आयोजीत केलेल्या कार्यशाळेमध्ये संवेदना प्रकल्पातर्फे श्री. राहुल देशपांडे व श्री. अनुप दबडगावकर यांनी सहभाग नोंदवला
2 दिवसीय "सेवा तरंग " या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या संस्था प्रतिनिधींसाठी आयोजीत केलेल्या कार्यशाळेमध्ये संवेदना प्रकल्पातर्फे श्री. राहुल देशपांडे व श्री. अनुप दबडगावकर यांनी सहभाग नोंदवला
दि. 11,12 फेब्रुवारी 2 दिवसीय "सेवा तरंग " या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार्या संस्था प्रतिनिधींसाठी आयोजीत केलेल्या कार्यशाळेमध्ये संवेदना प्रकल्पातर्फे श्री. राहुल देशपांडे व श्री. अनुप दबडगावकर यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेमध्ये संस्थात्मक कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या मध्ये मा. भैय्याजी जोशी यांनी "सेवेची भारतीय संकल्पना " या विषयावर बीज भाषण केले. दुपारच्या सत्रा मध्ये "महाराष्ट्रातील सामाजिक स्थिती व आपली भूमिका" या विषयावर डाॅ. उपेंद्र कुलकर्णी यांनी चर्चासत्र घेतले. या चर्चासत्रामध्ये राहुल देशपांडे यांनी संवेदना प्रकल्पामध्ये चालू असलेल्या कामांची माहिती दिली. नंतरच्या सत्रात श्री.अतुलजी लिमये यांनी "कार्यकर्ता जोडणी" या विषयावर प्रशिक्षण दिले. सायंकाळी आशुतोष जी ( सी.ए.) यांनी कर व्यवस्थापन, मुकुंदजी यांनी सीएसआर प्रस्थाव तयार करणे व परागजी यांनी "संस्थाचे धर्मदाय निगडीत प्रश्न" या विषयांवर " NGO Clinic" या कार्यक्रमातून मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध संस्थांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री आयोजित केली होती. 12 फेब्रुवारी रोजी सकाळ सत्रा मध्ये सेवा संस्थांचे सादरीकरण झाले व "सीएसआर एक्सचेंज" या विषयावर मा.गिरीशजी सोनी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर "सेवावर्धिनी बरोबर समन्वित कार्य" या विषयावर सेवावर्धिनी संस्थेचे कार्यवाह श्री. सोमदत्त पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचा समारोप मा. विजयजी पुराणिक यांनी केला. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. अनिल व्यास यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.