संवेदना प्रकल्पामध्ये रविवार दि 23 फेब्रुवारी 2020 रोजी कुटुंब स्नेहमिलन संपन्न झाले. प्रकल्पातील विद्यार्थी समिती सदस्य कर्मचारी यांच्या कुटुंबिय यांची 250 जणांची उपस्थिती होती. दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये सकाळी उदघाटन समारंभास जिल्हा परिषद लातूरचे मुख्य वित्त लेखाधिकारी श्री. रत्नराज जवळगेकर, श्री रवि वट्टमवार यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री रत्नराज जवळगेकर यांनी पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयत्न करण्याचे अवाहन केले. श्री रवि वट्टमवार यांनी कुटुंब हेच विशेष प्रशिक्षण थेरपी केंद्र या विषयावर आपल्या घरामध्येच पालकांनी प्रशिक्षण देण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.
उदघाटनानंतर पुरुष पालक व महिला पालकांचे विविध खेळ घेण्यात आले. मनोरंजनात्मक खेळांच्या माध्यमातून सर्वांनी खेळण्याचा आनंद लुटला. भोजनोत्तर संस्कार भारती लातूर यांच्या वतीने गीतगायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये शेतकरी गीत भावगीतांच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
समारोपाच्या कार्यक्रमास श्री. नामदेव कदम सहाय्यक महाव्यवस्थापक साधारण बिमा निगम यांची प्रमुख उपस्थिती होती. यामध्ये संवेदना प्रकल्पाच्या माध्यमातून चालणारे उपक्रम हे अत्यंत उल्लेखनीय असल्याचे सांगीतले. प्रसंगी श्री आप्पाराव कुलकर्णी यांनी राष्ट्रसंत गुलाबराव महाराज यांचे जीवनचारित्र्य सर्वांसमोर विषद केले. आभार श्री राजेश्वर बेंबडे यांनी मांडले. कार्यक्रमास शालेय समिती अध्यक्ष श्री. आण्णा चव्हाण , श्री. प्र मा जोशी श्री. शाम भराडीया, मुख्याध्यापिका दीपा पाटील यांच्यासह पालक कर्मचारी नागरिक यांची उपस्थिती होती