सक्षम लातूर जिल्हा अधिवेशन – दि. 14 डिसेंबर 2019 रोजी कालिकादेवी मंदिर, लातूर येथे संपन्न झाला. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणारे सक्षम हे राष्ट्रीय संघठन आहे. या संघठनेच्या जिल्हा अधिवेशनाचे उद्घाटक नॅब पश्चिम विभागाचे अध्यक्ष व मिरागी नेत्रालयाचे प्रमुख श्री विजयभाऊ राठी होते. अधिवेशनाचा समारोप सक्षम चे राष्ट्रीय सहसचिव डॉ. संतोष – हैद्राबाद यांनी केले. या वेळी संघाचे मा. जिल्हा संघचालक श्री संजयजी अग्रवाल, मा. तालूका संघचालक श्री विनोदजी कुचेरीया, सक्षम चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य श्री सुरेश पाटील यांचे समयोचित भाषण झाले. अधिवेशनाचे प्रास्ताविक व स्वागतपर भाषण जिल्हा अध्यक्ष डॉ. शिवाजी काळगे यांचे झाले. मंचावर जिल्हयाचे उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र सुडे व दुसरे उपाध्यक्ष प्रा.डॉ. बाळासाहेब चव्हाण, देवगिरी प्रांताचे सचिव श्री श्रीराम शिंदे होते.
अधिवेशनाच्या प्रारंभी शोभा यात्रा निघाली. या शोभा यात्रेची सुरुवात डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री संतोष नाईकवाडी यांनी करुन दिली. स्वाधार केंद्र- बुधडा येथील दृष्टीबाधीत बंधू- भगिनींनी स्वागत गीताने अधिवेशन सुरु झाले. समारोपा पूर्वी शासकीय अंध शाळेतील शिक्षक श्री अमोल निलंगेकर व त्यांच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायीले.
दिव्यांग व्यक्तींनी गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अधिवेशनाचे सुत्रसंचालन प्रा. पोहेकर मॅडम यांनी केले. अधिवेशनामध्ये 3 ठराव मांडण्यात आले.
1) महाराष्ट्र शासनाने RPD Act- 2016 च्या निर्देशानुसार राज्याचे नियम व अटी अदयाप निश्चित केले नाहीत, त्वरीत पूर्ण करावेत.
2) स्थानिक स्वराज्य संस्थाचा नियोजित 5 % दिव्यांग निधी प्रत्येक वर्षी खर्ची करण्यात यावा.
3) स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्विकृत सदस्य नियुक्ती करीत असाताना दिव्यांग व्यक्तींचा प्राधान्याने विचार करावा.
ठरावाचे वाचन श्री व्यंकट लामजणे यांनी केले. चौथा ठराव डॉ. भगवान देशमुख यांनी मांडले. लातूरचे मा. जिल्हाधिकारी यांनी लातूर शहरातील सर्व शासकीय कार्यालयाच्या इमारतीचे परिक्षण करुन अडथळा विरहीत दिव्यांगाच्या दृष्टीने सुलभ इमारतीमध्ये सुधारणा करण्याच्या सुचना दिल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. सर्वानुमते हा ठराव समंत करण्यात आला.
दिव्यांगा करीता विविध खेळामधील गुणवत्ता निर्माण करण्या करीता चर्चा झाली. प्रा. वाघमारे यांनी एक दिवसीय कार्यशाळेच्या आयोजनाची जबाबदारी स्विकाराली.
जिल्हयाचे सचिव श्री दीपक क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले. अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी श्री बस्वराज पैके, श्री योगेश शेळके, श्री योगेश्वर बुरांडे, श्री अनंत पाठक, शाहू महाविद्यालयातील कला विभागातील विद्यार्थिनी, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, कालिकादेवी मंदिराचे विश्वस्त आणि श्री सतीश पांचाळ, श्री रत्नदीप बोटवे, श्री वसंत पांचाळ, श्री व सौ. योगेश डांगे यांनी मेहनत घेतली. जिल्हयातील अनेक दिव्यांग बंधू – भगिनींनी सहभाग घेतला. केशवराज विद्यालयातील विद्यार्थांचा घोष सर्वांना आकर्षित करुन घेतला.