संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी इय्यता 10 वी च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले चि.हिराचंद सूळ या विद्यार्थ्याने सर्वाधिक 94.60% गुण घेऊन सर्वाधिक यश संपादन केले. त्याचबरोबर शेख जाहिद 89% व निखिल इंजे 71% हे विद्यार्थी बहुविकलांग असूनही दिव्यांगतेवर मात करीत यश संपादन केल्याबद्दल संवेदना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दीपाताई पाटील , शालेय समिती अध्यक्ष श्री व्यंकटसिंहजी चव्हाण, कोषाध्यक्ष प्र. मा जोशी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले