संवेदना प्रकल्पाचा वर्धापन दिन समारंभ रविवार दि. 21 आॅगस्ट रोजी संपन्र झाला. भारत माता प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम प्रारंभ करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत , गीतांनी केले. गाण्याच्या तालावर दिव्यांग विद्यार्थ्यांचे समूह नृत्यांनी उपस्थित वर्ग भारावुन गेला. त्यांची मेहनत वाखाणण्यासारखी होती. तत्पूर्वी संवेदना प्रकल्पात बसवण्यात आलेल्या लिफ्ट चे उद्घघाटन निरव बायोसोल्युशन प्रा.लि. च्या संचालिका सौ. वैशाली प्रवीण शर्मा यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना म्हणाले की, या ठिकाणचा परिसर, दिव्यांगासाठी होत असलेले कार्य पाहून आनंद वाटतो. दिव्यांगांची सेवा, सुविधा निशुल्क पद्धतीने होते. हे पाहूनसंस्थेच्या कार्याबद्दल आदर निर्माण झाला आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सौ. शोभा जाधव आले होते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना म्हणाले की, संवेदनशीलपणे कार्य कसे असते ते संवेदना शाळेत आल्यानंतर प्रखरपणे जाणवते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जनकल्याण समितीचे प्रांत संघटन मंत्री मा. श्री. शरदभाऊ खाडिलकर यांनी जनकल्याण समितीच्या कार्याची माहिती विषद केली. या संस्थेच्या कार्याचा उद्देश वंचित, दुर्लक्षित विषयासाठी कार्य करणे हा आहे. दिव्यांग व्यक्ती व त्यांच्या पालकांसाठी विविध उपक्रम जे घेतले जातात त्याचा आढावा त्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांत कार्यवाह श्री. तुकाराम जी नाईक होते.
या वर्षीचा जि. प. चा स्वच्छतेचा पुरस्कार “संवेदना” शाळेस मिळाला म्हणून या कार्यक्रमात सेविका व स्वच्छता विभागात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा रु. 1100 व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संगीत विषयात विशेष प्राविण्य मिळवलेले विद्यार्थी कु. नभा कुलकर्णी, चि. वरद कुलकर्णी , कु. प्रांजली उडानशीव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास हरंगुळ (बु)लातूर येथील प्रतिष्ठीत नागरिक, पालक, जनकल्याण समितीचे व सक्षम संस्थेचे कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांनी केले, श्री. अण्णा चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुरी बिल्लावार तर विद्यार्थ्यांचे सदरीकरण सौ. जयश्री माने व कु. प्रणिता क्षीरसागर यांनी करूवुन घेतले.