कोरोना मुळे आलेल्या आपत्तीच्या काळात आर्थिकदृष्ट्या दिव्यांग कुटुंबियांच्या घरी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले
कोरोना मुळे आलेल्या आपत्तीच्या काळात आर्थिकदृष्ट्या दिव्यांग कुटुंबियांच्या घरी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले
कोरोना मुळे आलेल्या आपत्तीच्या काळात आर्थिकदृष्ट्या दिव्यांग कुटुंबियांच्या घरी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात आले. संवेदना प्रकल्पाच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, सुमित्रा रामराव नागरकट्टी फाऊंडेशन, पुणे आणि सक्षम, लातूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर परिसरातील 50 दिव्यांग कुटुंबियांच्या घरी जीवनावश्यक वस्तुंचे वितरण एप्रिल 2020 च्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले. जे दिव्यांग घरीच असतात, हालचाल करण्याला मर्यादा आहेत आणि आर्थिकदृष्ट्या अतिसामान्य जे कुटुंब आहेत त्यांच्या करिता प्रत्येकी रु.1306/- चे साहित्य आहे. ज्याची एकूण किंमत 65300/- आहे. 50 कुटुंबातील एकूण संख्या 200 पर्यंत असेल. प्रत्यक्ष साहित्य वितरण करीत असताना एम.आय.डी.सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, प्रकल्पाचे सहकार्यवाह डॉ. योगेश निटुरकर, सक्षमचे प्रांत सचिव श्रीराम शिंदे, कोषाध्यक्ष भगवानराव देशमुख, श्री. व्यंकट लामजणे, श्री. बस्वराज पैके, श्री. किरण क्षीरसागर होते.